१. तिळगुळ समारंभ: जानेवारी पासून सुरुवात केल्यास पानसे मंडळाचा पहिला कार्यक्रम म्हणजे संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ - संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत सर्वांना सोयीच्या एखाद्या रविवारी सर्व पानसे मंडळींसाठी सोयीस्कर जागा भाड्याने घेऊन विविध मनोरंजक कार्यक्रम आणि भाषणे आयोजित केली जातात अर्थात मुख्य उद्देश हा एकमेकाला भेटणे असा असतो नंतर तिळगुळाची देवाण घेवाण होऊन आणिअल्पोपहार करून हा कार्यक्रम संपतो.
साधारण दोन ते तीन आठवडे अगोदर तिळगुळ समारंभाची सूचना माणसे मंडळींना एस एम एस, whatsapp, किंवा पोस्टाने पत्र पाठवून दिली जाते जेणेकरून सर्व मंडळी आप आपले वैयक्तिक कार्यक्रम आखून पानसे मंडळा च्या या कार्यक्रमाला सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहू शकतील.